Saturday, September 19, 2015

"प्रगत शै महाराष्ट्र" कार्यक्रम अत्यंत चांगला असून त्याला "आभासी गुणवत्ता" नावाच्या महाभयानक रोगापासून दूर ठेवायचे असल्यास खालील बाबीवर चर्चा होणे व निर्णायक मत प्रदर्शन होणे गरजेचं आहे.
आभासी गुणवत्ता म्हणजे आजपर्यंत घडत आल्याप्रमाणे पुर्व चाचणी कडक घ्यायची व उत्तर चाचणी मध्ये थोड सैल सोडायचं म्हणजे बरोबर कागदावर गुणवत्ता विकास दिसून येतो.
आता सदर उपक्रम तीन वर्षे चालणारी प्रक्रिया असल्याने आभासी गुणवत्तेवर नक्की आळा बसेल, मात्र तरीही आणखी एका गोष्टी कडे लक्ष देणे गरजेचं आहे. कि तीन वर्ष तो वर्ग एकाच शिक्षकाकडे राहण्याची दक्षता (अवघड आहे पण शक्य असेल तेवढी) घ्यावी. नाहीतर problem निर्माण होतो तो असा कि
उदाहरणार्थ, सन २०१५-१६ मध्ये इ. ५वी चा वर्गाची गुणवत्ता वर्षा अखेरीस जर ८०% निश्चित करण्यात आली असेल आणि ६ वी च्या वर्षारंभाला वर्गशिक्षक बदलला असल्यास नवीन वर्गशिक्षकांनी जर पुन्हा मूल्यमापन करून सदर वर्गाची गुणवत्ता ७०% दाखवली ( दाखले जाणे, नवीन दाखले येणे, कोणीही येऊन पहा सध्या माझ्या वर्गाची गुणवत्ता ७०% एवढीच आहे नंतर वर्षा अखेर मी 80% करून दाखवतो वैगेरे कारण देऊन)
    आणि या क्षणी जर ७०% गुणवत्ता मान्य करण्यात आली तर मात्र
"आभासी गुणवत्ता " नावाच्या रोगाची लागण झालीच म्हणून समझा.
" एकही मुलगा अप्रगत नसणा-या शिक्षकाचा सन्मान करणे" यामध्येही एक problem निर्माण होतो तो असा कि,
माझ्या वर्गात (५वी) यावर्षी ७ मुले अप्रगत असून त्यापैकी वर्षा अखेरीस मी ५ मुले प्रगत केली. तरीही २ मुले अप्रगत राहिल्याने ५वी चा वर्ग या वर्षी संपूर्ण प्रगत दिसणार नाही (१००%गुणवत्ता दिसणार नाही). पण पुढील वर्षी वर्गशिक्षक बदलून ६वी मध्ये मात्र फक्त २ च विद्यार्थी अप्रगत असणार व हे दोन विद्यार्थी प्रगत केले कि त्याचा संपूर्ण वर्ग प्रगत होणार (१००%गुणवत्ता)
म्हणजेच ५ विद्यार्थी प्रगत करणा-या शिक्षकाला १००% गुणवत्तेचा सन्मान मिळणार नाही फक्त २ विद्यार्थी प्रगत करणा-या शिक्षकाला १००% गुणवत्तेचा सन्मान मिळेल.
(येथे "फळाची आशा न धरता काम करणारे" , "भविष्य चा विचार न करता वर्तमान मधे फक्त चांगले काम करणारे" , "वर्तमान से भविष्य बनता है, भविष्य से वर्तमान नही," असा विचार करणारे शिक्षकांचा विचार केलेला नाही. कारण असा भग्वतगितेतील कर्मयोग जाणनारे महान लोक कमी असतात. व भविष्याचा विचार करून वर्तमान जगणारेच जास्त असतात.)
आपणाला व्यवस्था सुधारून प्रगत शै महाराष्ट्र घडवायचा असल्यास सर्व बाजूंनी विचार करायला हवा.
तात्पर्य इतकेच कि, एकही मुलगा अप्रगत नसणारा वर्गशिक्षक उत्कृष्ट आहेच त्याचबरोबर जास्तीत जास्त मुले प्रगत करणारा ही उत्तम आहे.
नाहीतर आभासी गुणवत्तेचा वास आलाच म्हणून समजा.
त्याचप्रमाणे शाळेतील, पालकांची, शिक्षकांची, तसेच इतर आपातकालीन परिस्थिति, हे सर्व प्रतिकूल असतानाही १ मुलगा प्रगत करून दाखविने व वरील सर्व परिस्थिति अनुकूल असताना २ मुले प्रगत करून दाखवने यामध्ये बराच फरक असतो हेही लक्षात घ्यावे लागेल. कारण नदीकिनारी १० झाडापेक्षा वाळवंटात १ झाड लावणारा श्रेष्ठ असतो.
कर्मण्ये वादी कार्यस्ते मा फलेशू कदाचन -

No comments:

Post a Comment